computer

निसर्ग वादळ- कसे निर्माण झाले, त्याचा मार्ग आणि त्यापासून धोका काय?

पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर अंफान नावाच्या वादळाने नुकताच धुमाकूळ घातलेला असताना महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सुद्धा निसर्ग नावाचे वादळ घोंघावत आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व  -पूर्व मध्य अरबी समुद्रात पुढच्या 48 तासात एक कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याच्या पुढच्या  48 तासात तो अजून तीव्र होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानुसार ज्यावेळी हे चक्रीवादळ जमिनीला टक्कर देईल त्यावेळी हवेचा वेग ताशी 120 किमी असेल. याचा धोका ओळखून महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात NDRF च्या टीमपैकी तीन मुंबईत, दोन पालघर आणि ठाणे,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथे एक- एक टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने अजून नेमके हे चक्रीवादळ कुठल्या भागात येईल हे स्पष्ट केलेले नाही. पण स्कायमेटनुसार उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यावर टक्कर देईल. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 1981 नंतर पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या चक्रीवादळाचे नामकरण निसर्ग असे करण्यात आले आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वादळात रुपांतरीत झाल्यावर हे नाव देण्यात आले. त्याआधी याला हिका म्हणण्यात येत होते.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुरुवातीला हे वादळ ओमान कडे जाईल असे वर्तविण्यात येत होते. पण आता हवामान विभागाने माहिती दिली की हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार गुजरातच्या दक्षिण भागात आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. असं म्हणतात की निसर्गमुळे गुजरातच्या दक्षिण भागात मोठ्याप्रमाणात पाऊस आणि सोसाट्याचा वारा येऊ शक्ती. महाराष्ट्रात आज रात्री किंवा उद्या निसर्ग अलिबाग भागात धडकेल आणि दुपारी तीनपर्यंत मुंबई मध्ये!!

सबस्क्राईब करा

* indicates required