computer

भारतात बंदी असलेली १० वादग्रस्त पुस्तकं !!

आज आम्ही घेऊन आलो आहोत भारतात बंदी असलेली १० पुस्तकं. या दहा पुस्तकांवर त्याच्यात असलेल्या वादग्रस्त लिखाणामुळे बंदी आणली गेली. यात ‘शिवाजी – हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकाचाही समावेश आहे. ‘जेम्स लेन’ या लेखकाने शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास लिहिल्याबद्दल मोठा वाद झाला होता. या वादां नंतर पुस्तकावर बंदी घालण्यात आली. आता हे पुस्तक भारताच्या हद्दीत कुठेही सापडणार नाही.

याच प्रकारे ज्या पुस्तकांनी वादग्रस्त विधानं केली अश्या पुस्तकांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. चला तर बघुयात ती पुस्तके आहेत तरी कोणती :

१०. अनआर्म्ड व्हिक्टरी – बर्ट्रंड रुसेल

भारत चीन युद्धाची पार्श्वभूमी असलेलं हे पुस्तक या युद्धा बद्दल वादग्रस्त विधान करतं. लेखक आणि नेहरुंमध्ये झालेल्या संभाषणातून या युद्धाची कारणमीमांसा करण्यात आली आहे. हे युद्ध भारत का हरलं याबद्दल बोलताना लेखकाकडून काही जहाल मतं बाहेर पडली आहेत त्यामुळे भारतात या पुस्तकावर बंदी घालण्यात आली.

९. नाइन ऑर्स टू रामा – स्टॅनली वॉलपर्ट

हे पुस्तक गांधी हत्येवर आधारित आहे. गांधी हत्येबाबत सरकारी सुरक्षा यंत्रणेला यात जबाबदार धरण्यात आल्याने या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. महात्मा गांधीची हत्या होणार हे माहित असूनही पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणेने काहीच पाऊल उचललं नाही असा आरोप यात करण्यात आला आहे.

८. दि रामायण – ऑब्रे मेनन

रामायण नव्या रूपाने सादर करण्याचा प्रयत्न ‘ऑब्रे मेनन’ यांनी केला होता. रामायण नव्याने लिहिताने त्यांनी जी व्यंगात्मक पद्धत वापरली ती बऱ्याचजणांना अपमानजनक वाटली त्यामुळे १९५६ साली या पुस्तकावर सरकारने बंदी आणली गेली.

७.प्राईज ऑफ पॉवर – सेम्योर हर्ष

या पुस्तकात मोरारजी देसाई हे अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयए चे अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला होता. यावरून मोरारजी देसाईंनी सेम्योर हर्ष यांच्यावर अमेरिकेत खटला दाखल केला होता पण आश्चर्य म्हणजे ते हा खटला हरले होते.

६. दि पॉलीस्टर प्रिन्स – हामिश मॅकडोनल्ड

धीरूभाई अंबानी यांचा संपूर्ण प्रवास या पुस्तकात दिला आहे. पण हा प्रवास अधिकृत मानला जाऊ शकत नाही. या पुस्तकात वर्णन केल्या प्रमाणे धीरूभाईंनी सरकारी यंत्रणांना आपल्या बोटांवर नाचवलं आणि आपला फायदा सध्या करून घेतला. हे वर्णन अर्थात अंबानी परिवारला आवडलं नाही आणि या पुस्तकावर १९९८ साली बंदी आणली गेली.

५. दि हिंदुज : अॅन आल्टरनेटिव्ह हिस्ट्री – वेंडी डॉनजर

हिंदू देवी देवतांना विनोदी पद्धतीने रंगवल्या प्रकरणी या पुस्तकावर २०१४ साली बंदी आणली गेली.

४. सॅटॅनिक व्हर्सेस – सलमान रश्दी

सलमान रश्दी हे एक नावाजलेले लेखक आहेत पण त्यांच्या 'सॅटॅनिक व्हर्सेस' पुस्तकाने जगभरात गोंधळ घातला होता. मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आणि एकूण इस्लाम बद्दल चुकीच्या गोष्टी छापल्या बद्दल जगभरातले मुस्लीम नाराज झाले होते. याचा परिणाम म्हणजे इराणच्या खोमेंनीनी सलमान रश्दी यांच्या विरुद्ध फतवा काढला. या पुस्तकाशी जोडले गेलेल्या काही माणसांचा कट्टरपंथी मुस्लिमांनी खून देखील केला. जगभरात हा गोंधळ चालू असतान भारतात राजीव गांधींनी या पुस्तकावर बंदी घातली.  

३. मदर इंडिया – कॅथरीन मायो

या पुस्तकातून भारतीय स्त्रिया आणि शुद्रांची परिस्थिती दाखवण्यात आली होती. या सर्व परिस्थितीला जबाबदार म्हणून भारतातील राजकारणाकडे बोट दाखवलं गेलं होतं. या सर्वांचा शेवट म्हणजे पुस्तकावर कायमची बंदी घालण्यात आली.

२. रंगीला रसूल - एम. ए. चमुपती

१९२० साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आजतागायत भारतात बॅन आहे. या पुस्तकात इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वैवाहिक व लैंगिक जीवनाचे वर्णन केले असल्याने त्यावर बंदी आणली गेली. 

१. शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया - जेम्स लेन

शिवाजी महाराजांचं चुकीचं चित्रण केल्या प्रकरणी या पुस्तकाबद्दल महाराष्ट्रभरात मोठा वाद पेटला होता.  २००३ मध्ये लिहिलेलं हे पुस्तक छापले गेल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात होतं. याच वादातून २००४ रोजी पुण्याच्या ‘भांडारकर ओरीयंटल रिसर्च सेंटर’वर हल्ला झाला. पुढे २०१० साली या पुस्तकावर बंदी घालण्यात आली.

सबस्क्राईब करा

* indicates required