'बाहुबली २' नंतर राजमौली या तिघांना घेऊन काय बनवतोय ते बघा !

येत्या २८ एप्रिल ला सर्वांनाच एका जागतिक प्रश्नाच उत्तर मिळणार आहे ते म्हणजे ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं’ पण बाहुबली २ नंतर काय असा एक नवीन प्रश्न सध्या अनेक जण विचारू लागले आहेत. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला जास्त काळ थांबण्याची गरज नाही कारण टिम बोभाटाने ते उत्तर शोधलंय.


सर्वांनाच उत्सुकता असलेल्या ‘बाहुबली २’ नंतर दिग्दर्शक ‘एस. एस. राजमौली’ घेऊन येत आहे आणखी एक भव्य सिनेमा तो म्हणजे ‘महाभारत’. बसला ना धक्का ??? खरा धक्का तर पुढे बसणार आहे जेव्हा आम्ही या सिनेमाचं कास्टिंग तुम्हाला सांगू. या सिनेमात ‘आमीर खान’, ‘रजनीकांत’ आणि ‘मोहनलाल’ असे फिल्म इंडस्ट्रीतले तीन बड्या कलाकारांना घेण्याच्या विचारात राजमामौली आहे. एका इंटरव्ह्यू मध्ये स्वतः एस. एस. राजमौली यांनीच हे स्पष्ट केलं आहे.


अमिरनेही एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटले होते की ‘मी राजमौलींच्या दिग्दर्शनाचा मोठा फॅन आहे...मला संधी मिळाली तर मला त्यांच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल...जर ते महाभारत करणार असतील तर मला कृष्ण किंवा कर्ण या पैकी कोणतेही पात्र करायला आवडेल’.


महाभारत हा सिनेमा बाहुबली प्रमाणेच भव्य दिव्य असेल यात काही शंका नाही पण यासाठी आपल्याला अजून काही वर्ष थांबावे लागेल पण तूर्तास आपण ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं’ या प्रश्नावर लक्ष देऊया.

सबस्क्राईब करा

* indicates required