तिने त्याला ‘नकार’ दिला आणि...त्याने जे केलं त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही !!

मंडळी, मुलीकडून नकार मिळाला की लोकांना प्रेमभंगाचा रोग होतो. त्यांच्यात विचित्र लक्षणे दिसू लागतात. दुःख अनावर होतं, राग येतो काही लोक तर थेट संन्याशी होण्याच्या मार्गावर निघतात. असो... मंडळी, प्रेमभंगाची अशी अनेक लक्षणे दिसून येतात. पण याउलट मध्य प्रदेशातील एका तरुणाने रागाच्या भरात जे केलं ते आपण स्वप्नातही विचार करणार नाही. या महाशयाने चक्क आपल्याकडचे ५ लाख रुपये जाळून टाकले आहेत.

पूर्ण बातमी काय आहे ?

मध्य प्रदेशातील सिहोर येथे राहणारा जितेंद्र गोयल. त्याने एका मुलीला प्रपोज प्रपोज केलं, पण तिनं नकार दिला. तिने सांगितलं की आपण दुसऱ्याशी लग्न करणार आहोत. हे ऐकून जितेंद्र संतापला. रागाच्या भरात त्याने लग्नासाठी ठेवलेले तब्बल ५ लाख रुपये जाळून भस्म केले. पण...पण....कहानी मे ट्वीस्ट है भिडू....

त्याने जे ५ लाख रुपये जाळले ते काही त्याचे स्वतःचे नव्हते राव. काय आहे ना, जितेंद्र एका फायनान्स कंपनीत कॅशिअर म्हणून काम करत होता. प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्याने कंपनीच्या लॉकर मधून तब्बल ६ लाख ७४ हजार रुपये चोरले होते.

स्रोत

कंपनीत चोरी झाल्याचं आढळल्यावर कंपनीने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी चौकशी केल्यावर जितेंद्र त्यांच्या हाती सापडला. पोलिसांच्या समोर तो पोपटासारखा बोलला. त्याने आपली कर्मकहाणी सांगितली. पुरावा म्हणून पोलिसांनी त्या जळालेल्या नोटा आणि उरलेले पैसे जप्त केले आहेत.

शेवटी काय तर ‘ती’ मिळाली नाही, पैसे सुद्धा मिळाले नाहीत पण जेल मध्ये राहण्याची सोय मात्र झाली. हे म्हणजे ‘तेलही गेलं, तूपही गेलं’ अशी गात झाली राव...

सबस्क्राईब करा

* indicates required