computer

द्राक्षांच्या राज्यात सफरचंद कुठून आले? नाशिकच्या शेतकऱ्याचा स्तुत्य उपक्रम पाहिलात का?

नाशिक म्हटले म्हणजे डोळ्यांसमोर येते द्राक्षांची शेती. द्राक्ष शेतकरी आता परदेशात पण द्राक्ष पाठवायला लागले आहेत. नाशकातील द्राक्ष शेतीने कित्येक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. पण याच नाशिकमध्ये सफरचंदाची शेती येऊ घातली आहे, असे सांगितले तर??

सफरचंद पिकते जम्मू आणि काश्मीरमध्ये तर नाशिक आहे महाराष्ट्रात मग हे कसे शक्य आहे? एका धडपड्या शेतकऱ्याच्या मेहनतीचा परिणाम म्हणून ही गोष्ट प्रत्यक्षात उतरत आहे. सटाणा तालुक्याच्या आखातवाडे या गावातील शेतकरी पंढरीनाथ ह्याळीज यांनी हा चमत्कार केला आहे. 

एक प्रायोगिक स्तरावर त्यांनी हा सफरचंद पिकवून पाहिला. त्यासाठी त्यांनी जवळपास १० गुंठा शेतीत २५ ते ३० सफरचंदाची झाडे लावली. त्यांच्या मेहनतीला मात्र खरोखरचे फळ लागले आणि ही झाडे चांगल्या पध्दतीने वाढली.

पंढरीनाथ हे मुळात द्राक्षाची शेती करतात, पण काहीतरी भरीव आणि वेगळे करण्याची जिद्द असल्याने त्यांनी नाशकात सफरचंद पिकवून दाखवले आहे. आता भविष्यात यात वाढ होऊन द्राक्षाप्रमाणेच नाशिक जिल्हा सफरचंदासाठी पण प्रसिद्ध झाला तर आश्चर्य  वाटायला नको.

सबस्क्राईब करा

* indicates required