computer

काश्मीरच्या खोऱ्यात वसलेल्या भारतातल्या एकमेव तरंगत्या भाजी मंडईची मनोहरी दृश्य !!

अभिजात सौंदर्य लाभलेला प्रदेश म्हणून काश्मीरची ओळख आहे. काश्मीरला "पृथ्वीवरील स्वर्ग"  म्हणून ओळखतात. 

"अगर फिरदौस बा रुए ज़मीन अस्त,
 हमीं अस्त-ए हमीं अस्त-ए हमीं अस्त-ए।"

या शब्दांत काश्मीरचं वर्णन केलं जातं. 

तुम्ही कोरोनानंतर जर एखाद्या ट्रीपला जाण्याचा विचार करत असाल तर काश्मीरसारखं ठिकाण नसेल. तिथं गेल्यावर इतरत्र कुठे न दिसणारी एक गोष्ट तुम्हांला तिथेच पाहायला मिळेल. काश्मिरच्याच प्रसिद्ध दल सारोवरात आहे भारतातली एकमेव तरंगती भाजी मंडई! चला तर मग जाणून घेऊया या भाजी मंडईबद्दल...

काश्मीर आपल्या सौंदर्याने जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असते. पर्यटक इथे येतात आणि इथलं निसर्गसौंदर्य पाहून सुखावतात. निसर्गाने इथे सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे.

दल सरोवर

काश्मीरला आल्यानंतर पाहायलाच हवं असं ठिकाण म्हणजे "दल सरोवर". यालाच "Lake of Flowers" किंवा "काश्मिरच्या सौंदर्याचा ताज" असदेखील म्हंटल जातं. दल सरोवर काश्मिरच्या स्थानिक व्यवहाराचा महत्त्वाचा भाग आहे.

दल सरोवरातली तरंगती भाजी मंडई

या सरोवरात एक तरंगती भाजी मंडई आहे. ही नेहमी हाऊसबोटींनी आणि लिलीच्या सुंदर फुलांनी वेढलेली असते.

पुरवठा

ही भाजी मंडई काश्मीर खोऱ्यातल्या श्रीनगर आणि इतर अनेक गावांना भाजीपाल्याचा पुरवठा करते.

उत्पन्नाचं मुख्य साधन

ही भाजी मंडई इथल्या रहिवाशांच्या उत्पन्नाच्या मुख्य साधनांपैकी एक आहे. इथल्या रहिवाशांनीच ही मंडई तयार केली आणि ती वाढवली आहे.

गरजेच्या वस्तूंचा सुलभ पुरवठा

इथले व्यापारी या मंडईतून गरजेच्या वस्तूंची खरेदी करतात आणि त्या वस्तू श्रीनगरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये विकतात.

भाजीपाला विक्रेते

या मंडईत भाजीपाला विक्रेते आपला माल बोटींमध्ये भरून आणतात आणि सरोवरात येऊन विकतात.

त्याचबरोबर तुम्हाला या सरोवरात गिऱ्हाईकांची वाट बघत बसलेले अनेक भाजी विक्रेते दिसतील.

कोरोना व्हायरसचा परिणाम

देशातल्या इतर अनेक भागांप्रमाणे दल सरोवरातल्या भाजी विक्रेत्यांनाही कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका बसला आहे. श्रीनगरमध्ये जवळपास ४००० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत आणि आजवर जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

भाजीपाला मंडईतले व्यापारी

दल सरोवरातला एक भाजीपाला विक्रेता.

अशा अनेक विक्रेत्यांनी ही मंडई फुलून गेलेली असते.

मंडईतली खरेदी झाल्यानंतर खरेदी केल्यानंतर आपापल्या घरी परतणारे नागरिक.

ही तरंगती भाजी मंडई श्रीनगर मधील एक सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे. 

तिथली शानच म्हणा ना!!

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required