computer

ही आहेत भारतातली १० अस्वच्छ रेल्वे स्टेशन्स...जाणून घ्या यादी आणि सांगा तुम्ही या सर्व्हेशी सहमत आहात का ?

राव, नुकतच भारतीय रेल्वे तर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणातून भारतातल्या १० अस्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील ३ नावे तर मुंबईतलीच आहेत राव. चला तर जाणून घेऊया ते ३ रेल्वे स्टेशन आहेत तरी कोणते ?

तर, कल्याण, कुर्ला, आणि ठाणे या तीन स्थानकांना या यादीत स्थान मिळालं आहे. यापैकी कल्याण तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे तर कल्याण आणि ठाणे अनुक्रमे ५ व्या आणि ८ व्या क्रमांकावर येतात.

मंडळी, ११ मे ते १७ मे दरम्यान भारतीय रेल्वे तर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात प्रवाशांना रेल्वे स्थानाकांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न एकूणच रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या सेवा आणि तिथल्या स्वच्छतेविषयी होते. प्रत्येक दिवशी १ लाख जणांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना प्रश्न विचारले गेले व अहवाल तयार करण्यात आला.

कल्याण स्थानकावरून रोज किमान २.१५ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांपैकी ५८.७४% लोक तिथल्या अस्वच्छतेमुळे नाखूष आहेत असं आढळून आलं. हा आकडा कुर्ला स्थानकाच्या बाबतीत ५५.८९ आहे तर ठाण्याच्या बाबतीत ८८.७२ आहे.

राव, या लिस्ट मध्ये मुंबई एकटीच नाही तर देशभरातले इतर ७ स्थानके सुद्धा आहेत. चला तर ती स्थानके कोणती आहेत तेही बघूया.

१. कानपूर सेन्ट्रल

६१.०६% लोक नाखूष

२. पटना जंक्शन

६०.१६% लोक नाखूष

३. कल्याण जंक्शन

५८.७४% लोक नाखूष

४. वाराणसी जंक्शन

५६% लोक नाखूष

५. कुर्ला

५५.८९% लोक नाखूष

६. अलाहाबाद

५५.८०% लोक नाखूष

७. जुनी दिल्ली

५५.७५% लोक नाखूष

८. ठाणे

५५.७२% लोक नाखूष

९. लखनऊ

५५.२५% लोक नाखूष

सबस्क्राईब करा

* indicates required